Tue. Oct 21st, 2025

पती पत्नीचे प्रेम

Spread the love

*पतीपत्नीचे प्रेम व सुखी* *संसाराचे रहस्य !*

✍️ २७०९

*विनोदकुमार महाजन*
( आंतरराष्ट्रीय पत्रकार )

👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨

प्रेम !
पवित्र शब्द !
ईश्वराच्या ह्रदयातून निर्माण होणारे पवित्र अमृत म्हणजे प्रेम !
उच्च कोटीची आत्म्याची दिव्य अनुभूति म्हणजे प्रेम !
पावित्र्य , शुध्दता , निरागसता , निरपेक्षता ,भव्यता , दिव्यता म्हणजेच स्वर्गीय प्रेम !
जे आजच्या स्वार्थी जगात दुर्मीळ होत चालले आहे !

प्रत्येक ठिकाणी स्वार्थाच्या बाजारात पवित्र , निस्सीम प्रेम दुर्मीळ होत चालले आहे !

ईश्वरावरील प्रेम , सद्गुरू ,पशुपक्षी , निसर्ग ,
नात्यागोत्यातील प्रेम यात शुध्दता , सात्विकता नसेल तर असे प्रेम काय कामाचे ?

पतीपत्नीमधील प्रेम हेही असेच उच्च कोटीचे असते !
त्यामुळेच पती पत्नीला लक्ष्मी नारायणाचा दर्जा दिला जातो !

पण दोघापैकी एकामध्येही असे पवित्र प्रेम नसेल तर , दूसरी बाजू आयुष्यभर एकटी पडून , कुजत राहते !

म्हणूनच पती पत्नीमधील प्रेमही असेच पवित्र असावे लागते !
दोन्ही कडूनही !
तरच तो संसार आनंददायी होतो !

पती किंवा पत्नी एकतर्फी प्रेम करत असेल तर तो संसार संसार रहात नाही !

ब-याच वेळा पती सगळ्यांच्या सुखासाठी अनेक तडजोडी करत असतो !
तर अनेक वेळा पत्नीही मोठे मन दाखवून तडजोडी करत असते !
सगळ्यांच्या सुखासाठी !

पण ब-याच वेळा एखाद्या स्त्रीचा सासरी अनन्वित छळ होत असतो !

घरातील सर्वच सदस्य , संबंधित स्त्रिचा अनन्वित छळ करत असतात !
तरीही ब-याच स्त्रिया मूकपणे , सर्वांच्या सुखासाठी असा मानसिक छळवाद ही सहन करत असतात !

घरातील सदस्यांकडून अथवा आयुष्याच्या जोडिदाराकडूनही असा छळवाद , मारहाण , शिवीगाळ आजच्या युगातही होत असेल तर ते नक्कीच भयावह आहे !

नशा करून अथवा माहेरहून पैसे आणण्यासाठी आजही एखाद्या स्त्रीवर अत्याचार करत असेल आणि संबंधित स्त्रिया असा अन्याय अत्याचार निपुटपणे सहन करत जीवन जगत असतील तर ?
हे लक्ष्मी नारायण तर दूरच ,
पैशाचिक अत्याचारच आहेत !

एखादा व्यक्ती , समाज अशा घटनेविरूध्द पेटून उठत असेल तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे !

पण.? आजची सामाजिक व्यवस्थाच अशी होऊन बसली आहे की , एखादा व्यक्ती अत्याचाराविरूध्द पेटून उठत असेल आणि बंडाची भाषा बोलत असेल…. तर ?
सामाजिक वातावरण अशा ” बंडखोर व्यक्तीला व्हिलन तर अत्याचारी समुहाला हिरो !” बनवून मोकळा होतो !

त्याच्या एकाकी लढ्यास ना सामाजिक पाठिंबा मिळतो ना कौटुंबिक पाठिंबा मिळतो !

एखाद्याच्या भल्यासाठी संबंधित व्यक्ती , स्त्री कठोर भूमिका घेत असेल तर अशा स्त्री , व्यक्तीलाच समाज व सगेसोयरे समस्याचे मूळ समजतात !

काळ कितीही बदलला , कायदे कितीही कठोर झाले तरी….असे सामाजिक उत्पात कधी संपणार आहेत ?
की संपणारच नाहीत ?
हा मूलभूत प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो !
कितीही विज्ञान युग आले अथवा मनुष्य चंद्रावर पोचला तरी सामाजिक विकृति समाजात चालतच राहणार हे नक्की !

घरचे सगळे काम बघून , पतीला सुख देण्यापासून ते प्रजोत्पादन व पुढच्या पिढीचा देवीच्या रूपात येऊन त्याचा आजीवन वात्सल्याने सांभाळ करणे , खरोखरीच शब्दातीत आहे !

नारीची नारायणी जरूर व्हावी पण त्याच बरोबर नराचा नारायण देखील जरूर व्हावा व नारायणी व नारायण यांनी मिळून विश्वोध्दारासाठी व ईश्वर निर्मित सत्य सनातन हिंदू धर्मासाठी आपले आयुष्य वेचावे एवढीच अपेक्षा !

।। सर्वे भवन्तु सुखिन:।।

हरी ओम् !!
जय हरी विठ्ठल !!

🙏🙏🙏🙏🙏

Related Post

Translate »
error: Content is protected !!