Thu. Jul 30th, 2026

एकट्याचे दु:ख

*दु:ख शेवटी एकट्यालाच*
*भोगावे लागते…?*
✍️ २८४०

*विनोदकुमार महाजन*

🫣🫣🫣🫣

दु:ख
हे शेवटी प्रत्येकाच्या वाट्याला येतेच येते.
आणी ते दु:ख पण शेवटी एकट्यालाच भोगावे लागते.
प्रत्येकाला कांहीं ना कांहीं दुःख असतेच.

आणी दु:ख म्हणजे ?
भयंकर कष्टदायक आयुष्य.

प्रत्येकाचे दुःख वेगवेगळे असते.आणी प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या व्याख्या आणी अपेक्षाही वेगवेगळ्या असतात.

पण ? दु:ख नेहमी स्वतःचेच मोठे वाटते.आणी ?
परदु:ख शीतल ?
दुसरा किती सुखी आणी आपणच किती दुःखी अशी सगळ्यांचीच साधारणपणे धारणा असते.

पण एक मात्र नक्की खरे आहे की ,
प्रत्येकालाच आपल्या दु:खात नक्कीच कुणाची तरी सहानुभूती हवी असते.
दु:खात कुणीतरी आपली आत्मीयतेने चौकशी करावी , मायेच्या चार शब्दांचा आधार देणारे कुणीतरी असावे , असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे.आणी तो मनुष्य स्वभाव ही आहे.

आत्मीयता , प्रेम , माया , ममत्व पशुपक्षानांही समजते.मग आपण तर मनुष्य आहोत.आपणालाही दुःखाच्या प्रसंगात कुणाचा तरी मायेचा आधार असावा असे वाटते.

पण शेवटी काय तर ?
दु:ख हे शेवटी आपल्याला एकट्यालाच भोगावे लागते.त्यात वाटेकरी कोणीही नसतो.आणी शक्यतो दु:खात वाटेकरी होण्याची कुणाची इच्छा पण नसते.
म्हणूनच की काय ? दु:खी माणसाला प्रत्येक जण जवळजवळ टाळण्याचाच प्रयत्न करत असतो.

श्रीमंत असो , गरीब असो , दुःख हे शेवटी प्रत्येकाला असतेच.
अगदी वैभवाच्या , ऐश्वर्याच्या राशीत दररोजच लोळतो आहे आणी ? त्याला दुःख नाही , असे कधिही होऊ शकत नाही.त्यालाही कांहीं ना कांहीं तरी दु:ख हे असतेच.

फक्त एक आहे की ,
दु:खाच्या प्रसंगात आपल्याला एक तरी खंबीर आधार हवा असतो.अगदी खंबीरपणे पाठीशी उभे राहणारा कुणीतरी हवा असतो.

प्रारब्ध भोग…हे ही दु:खाचे महत्वाचे कारण आहे.
पण ब-याच वेळा आपला अवाजवी अहंकार अथवा माणसं पारखण्याची आपली चूक…हे ही अनेक वेळा दुःखाचे कारण होऊ शकते.

पुर्वीची माणसं एकमेकांना सुखदुःखात खंबीर आधार द्यायची.संकटात धावून यायची.
पण अलीकडे काळ अगदी पार बदलून गेला आहे.
एकमेकांबद्दलची सहानुभूती , प्रेम , माया , ममत्व जणू संपतच चाललंय की काय ? असं वाटू लागलंय.

शुष्क आणी कोरडी ह्रदये आणी फक्त पैशासाठी आणी स्वार्थासाठीची नातिगोती .

हल्ली माणसं मनानं एकमेकांपासून दूरावत तर आहेतच , कुणी कुणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत ही कुणी नाही.कुणी कुणाची विचारपूस करायला तयार नाही.कुणी कुणाची आत्मीयतेने चौकशी ही करायला तयार नाही , अशी सामाजिक परिस्थिती निर्माण होते आहे.

परदेशात गेलेल्या मुलांचे आईवडील एकटे आणी एकाकी जीवन जगत आहेत.त्यांना कुणाचा तरी मानसिक आधार हवा आहे , पण तो ही मिळायला तयार नाही ?
अशी बिकट आणी केवीलवाणी सामाजिक स्थिती बनते आहे.
बरं… एकटं जीवन जगणाऱ्या दोघांनाही कुणी समाजात , पाव्हण्यारावळ्यात आधार द्यायला तयार नाही.

एखाद्याचा आयुष्याचा जोडीदार कायमचाच सोडून ( निधन झाले ) निघून गेला तर ? त्या एकट्या माणसाची अजून भयंकर बिकट स्थिती निर्माण होते आहे.

आतल्या आत विचारांचे असह्य काहूर आणी जीवघेणा संघर्ष.

आणी अशातच सामाजिक जाणीवा ही बोथट होत चालल्या आहेत.संवेदना संपत चालल्या आहेत.

मग दु:खात कोण आधार देणार ? कमीत कमी ( अगदी फुकटचा ) मानसिक आधार तरी ? पण तो ही जवळजवळ दुरापास्त होत चालला आहे.

आत्मा हरवलेली की आत्मा मेलेली माणसे ? की आत्मतत्त्व विसरलेली माणसे ?

दु:खात आधार नाही मिळाला की मनाची खंत… आणी मग सुरू होते , एकाकी असह्य जीवन.

दु:ख कुणापाशी बोलायला , मन हलके करायला ही जागा नाही ? अशी दयनीय सामाजिक अवस्था.

जवळपास प्रत्येक ठिकाणी हेच विदारक चित्र ?

एकत्र कुटुंब व्यवस्था नष्ट झाली.फ्लॅट संस्कृती वाढत चालली.अनायासे एकाकीपण ही वाढत चालले.
मनाची कोंडी , आतल्या आत घुसमट वाढत चालली.

आजची फार दयनीय सामाजिक अवस्था आहे.

खेड्यातली परिस्थिती जरा वेगळी आहे असे वाटत होते.पण आता खेडी सुध्दा झपाट्याने बदलत चालली आहेत.
प्रेम , आत्मीयता तिथेही संपत चालली आहे , असे वाटते आहे.
प्रेम , आत्मीयता तिथेही संपत चालली आहे की काय असे वाटू लागले आहे.

हेवे , दावे , द्वेष , मत्सर टोकाचा वाढतो आहे.कुढ्या मनोवृत्ती ची माणसे वाढत आहेत.
अशातच गट तट वाढत जात आहेत.

आपसी इर्षा , टोकाचा जीवघेणा कलह याचा जागोजागी उद्रेक होतो आहे.

पण ? एखाद्याचं वैयक्तिक दुःख , त्याची असह्य तडफड आणी त्याला आधार देण्याची मानसिकता , याच्याशी कुणालाच कांहीही घेणंदेणं नसावं , असं वाटू लागलं आहे.

बरं…मनं… विश्वासाने कुणापाशी हलकं करावं , मनातलं दुःख कुणापाशी बोलावं तर ?
दु:खात आधार मिळणं दूरच , गैरफायदा घेणारे , टिंगल टवाळी करणारे , मागे निंदा करणारांची संख्याही प्रचंड वाढते आहे.

मग दु:ख बोलायचे तरी कुणापाशी ?

दु:ख दुसऱ्याला सांगीतल्याने ते हलके होते , असे म्हणतात.
पण अशी मन हलके करण्यासाठी एक ही जागाच अख्या जगात शिल्लकच राहीली नसेल तर मग शेवटी बोलणार कुणापाशी ?
अशी सार्वजनिक स्थिती वरचेवर वाढत चालली आहे.

अलिकडे सामाजिक संघटनांमध्ये तरी आत्मियता कुठे जाणवते ? सगळा मोठेपणाचा आणी अहंकाराचा बाजारच वाटतो.
अथवा पैशांचे खेळ.

मग दु:खात आत्मीयता कुठून भेटणार ?

संकटात कोरडी सहानुभूती नको असते तर खंबीर मानसिक आधार हवा असतो.
आणी तोच नेमका मिळत नाही.

मग चालू होते , मनाची घुसमट.आणी त्या घुसमटीला वाट करून देण्यासाठीची वेगवेगळी उपाय योजना.

पण एवढं जरी झालं तरी , एक मात्र नक्की खरे आहे की ,
संकटात , दुःखात कुणी आधार देवू अथवा न देवू , ईश्वर मात्र नक्कीच खंबीर आधार पण देतो.आणी प्रत्येक दुःखात खंबीरपणे अगदी चोवीस तास पाठीशी उभा पण राहतो.

पण ? त्यासाठी सुद्धा ईश्वराला आर्ततेने हाक मारता आली पाहिजे.
ईश्वरावर खरंखुरं प्रेम करता आलं पाहिजे.
त्यासाठी त्या अद्भुत शक्तिवर अतूट विश्वास प्रेम आणी श्रध्दा असायला हवी.

मग बघा संपूर्ण आयुष्यच कसं बदलून जातंय ते.
संपूर्ण आयुष्यच उजळून टाकण्याची व आयुष्य बदलण्याची शक्ती ईश्वरी तत्वामध्ये आहे , याची नित्य आणी दिव्य प्रचिती तुम्हाला पावलोपावली येईल.

हा माझा स्वानुभव आहे.

मग ?
तुम्हाला दु:खात आधार शोधण्याची गरज लागणार नाही तर ?
तुम्ही स्वतःच इतरांच्या दुःखात आधार वड बनाल.

फक्त धन वैभवासाठी देवाला हाक मारायची आणी ? धन वैभव मिळालं की देवाला विसरून जायचं ? आणी धन वैभव नाही मिळालं की ? देवाला चार शिव्या द्यायच्या ? असलं स्वार्थी , मतलबी प्रेम काय कामाचं ?
असली स्वार्थी मानसिकता जवळजवळ आज ब-याच ठिकाणी पहायला मिळते आहे.

देव कांहीं बाजारचा भाजिपाला नाही , अथवा देव कुणाचा नोकरही नाही ,
हाक मारली की आला ?

गरज लागली की ? देवाची आठवण येणार ?
आणी ? सुखाचे चार दिवस आले की ?
कोण भगवंत ? आधी दाखवा मला …
असलं अहंकरी , उन्मत्त प्रेम ?
देवाला कसे आवडेल ?

देव तर ?
भावाचा भुकेला…

केवळ एकदाच देवाचे नाव घेऊन तो कसा भेटेल ?

म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात…
” *जन्मोजन्मी आम्ही* *बहुपुण्य केले… तेंव्हा या* *विठ्ठले कृपा* *केली…”*

तर एकंदर जीवनाचे सार काय तर…?
माणसाचा नव्हे तर ?
देवाचा आधार शोधावा.
तोच खरा आणी अंतिम आधार असतो.
*बाकी सब भुलभूलैय्या ** *है*

*निःशंक होई रे मना…*

*भिऊ नकोस मी तुझ्या* *पाठीशी आहे…*

*श्री स्वामी समर्थ*

🌹🌹✅🕉️

व्हाट्सअप नंबर
+91 8329894106
( भारत देश )

Related Post

Translate »
error: Content is protected !!