परदेशात लोकं ? चालली पळून ??
✍️ २६११
🤔😳🤔😳🤔😳
प्रोग्रेस, प्रगति याच्याविषयी ब-याचं लोकांना कांहीही घेणंदेणं नसतं.
फक्त लाथाळ्या , लाथाळ्या आणी लाथाळ्या.
आयुष्यभर लाथाळ्या अन् एकमेकांच उणदुणं काढणं.
प्रोग्रेस साठी शून्य प्रयत्न.
आयुष्यभर फक्त द्वेष, मत्सर ,हेवेदावे, निंदा,नालस्ती ,कुटील कारस्थान यांनीच अख्ख जीवन भरलेलं.
कर्तृत्व ? शून्य !
अन् कुणी पुढे चालला ,
स्वकर्तृत्वाने मोठा व्हायला लागला की ?
त्याला सहकार्य सोडाच…
त्याचेच पाय ओढणं , त्याला बदनाम करणं,त्याला अपमानास्पद वागणूक देणं,
त्यालाच स्वार्थी, मतलबी, ढोंगी म्हणणं….
हेच चाललंय का हो अख्खा देशात ? अन् हिंदू समाजात ?
म्हणूनच हिंदू अन् देशसुध्दा मागं आहे का हो ?
घरोघरी मातीच्या चुली ?
( स्साँरी…घरोघरी लोखंडी गँस ?…कारण काळ बदललायं ना ? चुली गेल्या अन् गँस आला ? )
डोकं खरंच चक्रावून जातं ना असल्या भयंकर प्रकारानं ?
कांहीच सुचत नाही.
स्वतः पुढं जायचं नाही.
दुस-याला पुढं जावु द्यायचं नाही.
पुढ जाणाराला रात्रंदिवस दुषण देऊन छळतं रहायचं ?
त्याला एकट्याला तरी आनंदाने जगु द्या ना रे बाबांनो ?
खरंच , आम्ही कधी सुधारणार ?
” विना सहकार,
नही उध्दार ”
असं म्हणतात.
अहो इथं सहकार तर दूरच सोडा हो,
पावलोपावली जळक्या मनाचीच लोकं भेटतात.
सुखातही त्रास देतात.
दुखा:तही त्रास देतात.
कसंच जगु देत नाहीत.
सुखानं ही नाही, अन् दु:खानही नाही.
काय घोर कलियुग आलं रे बाबा ?
सहकार्य केलं तरी ?
जळफळाट ?
अलिप्त राहिलं तरी ? जळफळाट ?
विरोध केला तरीही ? जळफळाट ?
एखाद्याचा भयंकर मानसिक छळ करून करून , त्याला येडं करायचं , त्याला मानसातून उठवायचं , आयुष्यातून उठवायचं , समाजातून उठवायचं , सग्यासोय-यातूनही उठवायचं.
अन् वर पुन्हा ?
त्या येड्यालाबी बदनाम करायचं ? त्याला बी छळायचं ?
काय राव दुनियादारी ?
एकंदर काय तर स्वस्थ अन् शांत पणानं ?
जगुच द्यायचं नाही ?
पारायण करायची अन् ?
आत द्वेष खदखदलेला ?
अन् यावर उत्तर ?
रामबाण औषध ?
नाही ? नाही ?
मनं साफं करणारी मशीन मार्केट मध्ये मिळत असती तर बरं झालं असतं ना ?
एकंदर काय तर ?
असंच जगतं रहायचं आयुष्यभर ?
स्वतःही सुधारणार नाही, अन् दुसऱ्यालाही सुधरू देणार नाही.
असा आमचा ?
विकृत समाज ??
म्हणूनच लोकं ?
परदेशात चालली हो पळून ?
असल्या प्रकाराला कंटाळून , वैतागून ?
काय करणार ??
बिच्चारी !!
😭😭😭😭😭
विनोदकुमार महाजन