Sat. Jul 27th, 2024
Spread the love

गौतमबुध्दाने बायकापोरं ,घरदारं सोडलं ते कायमचंच .
पुन्हा मागं वळून बघितल नाही.
कोण मेलं ,कोण जगलं याची चींता केली नाही.
भक्तिवेदांत प्रभुपादांचही तेच.
सुभाषचंद्र बोस यांचही तेच.
आणी अनेक महापुरुष , सिध्दपुरूषांचं जीवनही असंच.
म्हणूनच ते महापुरुष झाले.अजरामर झाले.

कसली नातीगोती नी कसले आप्तेष्ट ?
सगळचं मिथ्या.
मोहमायेचा खोटा फापटपसारा.
सगळा भुलभुलैया.

म्हणूनच भाग्यवान आहेत नरेंद्र मोदी , योगी आदित्यनाथ , रामदेवबाबा सारखे महापुरुष. ज्यांनी धर्म कार्यासाठी ,ईश्वरी कार्यासाठी घरदार ,नातीगोती एका फटक्यात झुगारून दिली. अन् ईश्वरी कार्यासाठी स्वत:च संपूर्ण आयुष्यच झोकून दिलं.
श्रीहरी.

विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!