
*देवसुद्धा धावत येईल..*
✍️ २८७९
*विनोदकुमार महाजन*
✅🩷🩷🩷
खरंच मित्रांनो ,
तो सावळा श्रीहरी ,
पंढरीचा पांडुरंग…
साक्षात विठ्ठल सुध्दा ?
आपल्या प्रेमासाठी विटेवरून दुडूदुडू धावत येईल.
चिमण्या कावळे गाई म्हशी सुध्दा आपल्याशी बोलतील.
आपल्या प्रेमासाठी वेडेपिसे होतील.
कायमस्वरूपी आपलेसे होऊन जातील.
पण मनुष्य ?
थांबा…
दुष्ट मनुष्य ? क्रूर मनुष्य ? खट्ट पाषाण ह्रदयी मनुष्य ?
प्रेमासाठी वेडापिसा होईल का हो ?
नाही , सपशेल नाही.
अहो असं जर असतं ना ? तर ?
अख्या जगाला वेड लावणारा तो ? प्रभू परमात्मा श्रीकृष्ण ?
जेंव्हा दुर्योधनाकडे कृष्ण शिष्टाई साठी गेला तेंव्हा ?
काय घडलं हो ?
प्रत्यक्ष प्रभू परमात्म्याचे सुध्दा दुष्ट दुर्योधनाने ऐकले नाही.
श्रीकृष्णाला युद्ध खरंच नको होतं.
पण दुष्ट दुर्योधनाने श्रीकृष्णाच्या कृष्ण शिष्टाई ला सुध्दा धूडकावून लावले.
मग काय ? हाती कांहीच लागलं नाही म्हणून श्रीकृष्ण हताश उदास होऊन दुर्योधनापासून परत आला का ?
नाही.
भगवंत हताश उदास कसा होईल.
दुष्टांचा समूळ नाश करायचा खंबीर निर्णय घेऊनच श्रीकृष्ण परत आला.
आणी पुढे घडले ते ?
घनघोर महाभारत युद्ध आणी ?
दुष्टांचा समूळ नायनाट.
खरंच सांगा मित्रांनो ,
जर श्रीकृष्ण परत देह धारण करून आला तर ?
आजचे पावलोपावली वसलेले दुष्ट दुर्योधन , दुष्ट लोक खरंच त्या प्रभू परमात्मा श्रीकृष्णाचे ऐकतील का हो ?
अहो आजचा काळ तर किती भयावह आणी घनघोर आहे ? हे आपणासारख्या प्रत्येक सज्जन पुरूषास माहिती आहे.
वेगळे सांगण्याची गरज नाही.
आजच्या अशा भयावह परिस्थिती मध्ये , श्रीकृष्ण जर देह धारण करून आला तर ?
त्याला सुद्धा मारायला उठतील.
खरं की खोटं ते तुम्हीच सांगा.
मग आजच्या अशा अती भयावह परिस्थितीला अंतिम उत्तर काय आहे ?
आज जर श्रीकृष्ण देह धारण करून अवतरला तर काय करेल ?
उदास , हताश मनाने स्वर्गाला परत जाईल की ?
दुर्योधनाच्या वेळी जसा कठोर झाला , सत्याच्या आणी धर्माच्या विजयासाठी कर्तव्य कठोर बनला ?
तसा आजही होईल ?
आजची परिस्थिती तर अती भयावह आहे.जगाच्या कानाकोपऱ्यात अधर्माचे विनाशकारी थैमान अती भयंकर आहे.
जागोजागी ईश्वरी सिद्धांत उखडून टाकण्यासाठी ? एकाच वेळी, लाखोंच्या संख्येने, पावलोपावली, उन्मत्त, उन्मादी दुष्ट दुर्योधन, कॅंस , रावण , हिरण्यकश्यपू , जरासंध , बकासूर ?
पावलोपावली टपून बसलेले आहेत.
ईश्वरी शक्ती आणी ईश्वरी सिद्धांत चहुबाजूंनी भरडले जात आहेत ?
सज्जन शक्ती , साधू संत प्रचंड संकटात आणी अडचणीत आहेत.
स्वर्गीय देवता, गौमातेचे आक्रंदन भेसूर आहे.
मग ?
अशा भयावह स्थिती मध्ये ?
ईश्वरी शक्ती शांत , मौन आणी स्थितप्रज्ञ राहू शकेल का ?
प्रश्न सगळ्या सज्जन शक्तिला तर आहेच.
प्रत्यक्ष प्रभू परमात्मा श्रीकृष्ण याला ही माझा प्रश्न आहे.
बघू या , ईश्वर काय उत्तर देतो ते ?
निरागसतेने विचारलेल्या प्रश्नांना व निरागस शक्तीच्या रक्षणासाठी आता ?
प्रत्यक्ष भगवंताकडे काय उत्तर आहे ते आपण पाहू या…
( *समस्या कितीही* *भयावह असली तरी ?* *थंड डोक्याने* *घेतलेले* *निर्णय आणी केलेली* *अंमलबजावणी नेहमीच* *हितकारक* *ठरते — जय श्रीकृष्ण* )
*श्रीकृष्णार्पणमस्तू*
🙏🙏🩷✅
