
*समजूतदारपणा…!*
✍️ २८६०
*विनोदकुमार महाजन*
🩷🌹🌹🌹
*समजूतदारपणा…*
प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा.
जसजसे वय वाढत जाते , तसतसा प्रत्येक व्यक्ती जवळजवळ ( कांही अपवाद वगळता ) जास्तीत जास्त समजूतदार बनत जातो.
आपल्या इच्छेविरुद्ध , आपल्या मनाविरुद्ध जरी अनेक गोष्टी घडत गेल्या तरी ? निमुटपणे सहन करत , सोशिकतेने जीवनात तडजोडी करत राहतो.
वास्तविक पणे समजूतदारपणा हा आयुष्यातील अनेक जटील प्रश्न ही सोडवण्यास सहाय्यक होतो आणी संबंधित व्यक्तीस अनेक प्रकारच्या उच्च स्थानावर घेऊन जातो.
पण ? समजूतदारपणा असायला , इच्छेविरुद्ध अनेक तडजोडी करायला सुध्दा , मनाचा खूप मोठेपणा लागतो.आणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे , त्या व्यक्तीचा मेंदू अतिशय थंड असावा लागतो.
तरच समजूतदारपणा साध्य होतो.
गरम डोक्याची माणसे काय समजूतदारपणा दाखवणार ? आणी आयुष्यात काय तडजोडी करणार ?
पण अलिकडे झालंय काय तर ? उथळ विचारांची आणी गरम डोक्यांची माणसेच आपल्याला जागोजागी पहायला मिळतात.
अगदीच क्षुल्लक गोष्टीवरूनच , क्षुल्लक कारणावरून जागोजागच भांडण , तंटे , कुरबुरी पहायला मिळणं , हे याचंच प्रतीक आहे.
खोटं असलं तरी…
” *हम करेसो कायदा…”* अथवा..
” *मुझसे बडा कोई हो ही* *नहीं सकता…”*
ही अहंकारी वृत्ती समाजात जागोजागी थैमान घालते आहे.
आणी ? याचा परिणाम काय तर ?
चांगल्या माणसांनाही याचा निष्कारण आणी अत्यधिक त्रास सहन करावा लागतो आहे, मनस्ताप होतो आहे.
ब-याच वेळा समाजात असेही दिसते की ,
समजूतदार माणसे अथवा जागोजागी तडजोडी करणारी माणसे सुद्धा , ब-याच ठिकाणी , आखुड बुध्दीच्या आणी हेकेखोर माणसांमुळे पावलोपावली अडचणीत येत आहेत.
सगळीकडून संकटात सापडलेला , वैतागलेला अथवा आजारी व्यक्ती नाही समजूतदारपणा दाखवू शकत , अथवा नाही तडजोडी करू शकत , हे खरेही आहे.
आणी तो त्याचा दोषही नाही.
पण ? होतंय काय तर ?
अशा संकटात सापडलेल्या , वैतागलेल्या , आजारी माणसांना , गरज असते ती आधाराची.
आत्मीक सहानुभूतीची.
पण ? अशा लोकांना ही ब-याच वेळा समाजातील अथवा स्वकीय माणसेच समजावून घ्यायला आणी त्याला आधार द्यायला तयार नसतात.
कारणे कांहीही असोत.
पण समाजात आज जिकडे तिकडे वैतागवाडी पहायला मिळते आहे.
समजूतदारपणा , तडजोडी या गोष्टींचा अभाव जवळपास सगळीकडेच दिसतो आहे.
आणी ज्याच्याकडे समजूतदारपणा असतो , पावलोपावली तडजोडी करण्याची तयारी व कुवत असते ?
अशा माणसांना ही कोणीच समजावून घेत नाही.उलटपक्षी त्यांच्यावरच भयंकर चिखलफेक केली जाते , हे पण दुर्देवचं म्हणावे लागेल.
एक काळ असा होता की , समजूतदार माणसांची समाजात खूप कींमत तर होतीच.
शिवाय त्यांचा समाजात आदरयुक्त दरारा ही होता.
पण आता या गोष्टी दुर्देवाने नामशेष होऊ लागल्या आहेत का ? असे वाटते.
एक तर समजुतदारपणाचा अभाव अथवा ? ज्याच्याकडे समजुतदारपणा आहे ? त्यांची कींमत शून्य…
असेच विदारक चित्र ब-याच ठिकाणी आपणाला पहायला मिळते.
समाज आणी समाजमन वेगाने कुठे चालले आहे ? तेच हल्ली कळेनासे झाले आहे.
भौतिक सुखं वाढली , आणि ती सगळी सुख मिळवण्यासाठीची दगदग धावपळ वाढली.अनायासे पैशाने विकत मिळणारी सुखं मिळवण्यासाठी प्रत्येकाचा संघर्ष वाढला.
त्यामुळेच ब-याच जणांच मानसिक स्वास्थ्य हरवत चाललं.
साहजिकच चीडचीडेपणा वाढला.
त्यातूनच समजूतदारपणा , तडजोडी या गोष्टी कालबाह्य ठरू लागल्या.
आज सामाजिक गणितही पैशावरच मांडली जाऊ लागली आहेत.
ज्याच्याकडे भरगच्च पैसा ? तो सुखी ही सामाजिक धारणा ही वाढीस लागली आहे.
त्यामुळे सद्गुण , चांगुलपणा याची हळूहळू कींमत कमी झाली , अथवा सद्गुणांचीच पायमल्ली झाली ?
असं म्हणता येईल का ?
मग ही सामाजिक विकृती आहे की ? सामाजिक विकास ? की सामाजिक अंध:पतन ?
अनायासेच सुसंस्कृत पणाचा अभाव जागोजागी जाणवू लागला.
त्यातूनच एकमेकांबद्दल ची आत्मीयता संपत चालली.
त्यामुळे नात्यातील दुरावा ही वाढत चालला.
मग ? अशा विकृत समाज रचनेमध्ये चांगुलपणा , सद्गुण याला कोण कींमत देणार ?
आणी मग ? कितीही तडजोडी केल्या अथवा समजुतदारपणा दाखवला तर ?
त्याची कींमत तरी कोण ठेवणार ?
पूर्वीचे हास्याचे कारंजे उडवणारे जागोजागीचे आनंदी वाडे जवळपास मोडकळीस आले आणी ? माणसं वरचेवर ह्रदय शून्य बनत चालली.
त्यातच पुन्हा फ्लॅट संस्कृती वेगाने उदयास आली , आणी ?
आत्मीयता , आपुलकी नावाची चिजच इतिहास जमा झाली , अथवा होत चालली ?
अशी दयनीय सामाजिक अवस्था आज झाली.
हळूहळू शहरही भकास आणी उदास होत गेली.
खेडी बरी होती , असं म्हणत होते , पण ?
तिथेही आता…
फक्त पैशाचीच गणीतं गृहीत धरली जाऊ लागली.
पुर्वी एक जुनी म्हण होती…
*विद्वान सर्वत्र पूज्यते*
पण ही म्हणचं आज जवळपास कालबाह्य झाली आणी…
*धनवान सर्वत्र पूज्यते*
अशी विचित्र आणी विकृत सामाजिक मानसिकता तयार झाली.
आज जो तो सुखं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे , खोट्या सुखाच्या मागे ही धावतो आहे.
प्रत्येकालाच सुखी व्हायचं आहे , म्हणून प्रत्येक जण पळतोय.
पण ?
ख-या सुखाची व्याख्याचं माणूस हरवून बसलायं तर मग तो ?
खरा सुखी कधी आणी कसा होणार ?
हाच आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे , आणी हा किमान आज तरी अनुत्तरित प्रश्न आहे.
कारण ?
*ख-या सुखाची चावीच* आज माणूस हरवून बसलायं…हे मात्र नक्की खरे आहे..
मग अशा भयंकर वातावरणात , ख-या समजूतदार माणसांना तरी कोण विचारणार ?
उलटपक्षी…?
समजूतदार माणसेच जर समाजात टिंगलीचा विषय ठरत असतील अथवा त्यांनाच जागोजागी प्रताडीत , अपमानित केले जात असेल तर ? मात्र ?
हा समाज नक्कीच विनाशाकडे वाटचाल करतो आहे , असे समजावे…
एखाद्याच्या चांगुलपणाची कींमत नका करु…पण त्यांना कमीतकमी अपमानित तरी केले जाऊ नये…
एवढीच या निमित्ताने अपेक्षा करतो.
असो…
*कालाय तस्मै नमः*
🙏🙏🙏🙏
